वादग्रस्त विधाने महागात पडतात   

अजित पवारांकडून कोकाटे यांची कानउघाडणी

मुंबई : कृषी खाते ही ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वादग्रस्त विधान करणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची कानउघाडणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. ‘काही गोष्टी बोलून का दाखवता? त्या मनात ठेवायच्या असतात’, असे सांगत त्यांनी तुमची वादग्रस्त वक्तव्य फार महागात पडत असल्याचे सांगितले. माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून एक विधान केले होते. तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. नाशिक दौर्‍यावर  नुकसानीची  पाहणी करताना त्यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

Related Articles